लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, कॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊंचे जीवन व साहित्य या विषयावर विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० छत्रपती भवन, सोलापूर येथे प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे मिलिंद आवाड व बाबुराव गुरव हे प्रमुख वक्ते असणार आहेत.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर