नाशिक (प्रतिनिधी) : बदलणार्‍या सामाजिक वास्तवाचा, जीवनशैलीचा कोवीड-19 चा प्रादुर्भाव, त्याचबरोबर प्रेमाचं, भावभावनांचं प्रतिबिंब, शेतकर्‍यांच्या दु:खाचं आणि चिंतन करणार्‍या कवितांनी बहर कवितेच्या ऑनलाईन काव्यस्पर्धेत कवींनी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले. सदर स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई, चंद्रपूर, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, पुणे, अहमदनगर, गडहिंग्लज, नांदेड, सोलापूर, अकोला व नाशिक अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी स्पर्धेची गुणवत्ता वाढविण्यास मदत केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक : श्वेता अजय पाटील, धुळे - रुपये 2001 व प्रमाणपत्र कवितेचे नाव : आयुष्याची जीवनगाथा द्वितीय क्रमांक : सायली रविंद्र पवार, साक्री, जि.धुळे - रुपये 1501/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : हे नारी तृतीय क्रमांक : तेजस्वी रविंद्र महाडिक , नवी मुंबई - रुपये 1001/- व प्रमाणपत्र कवितेचे नाव : मुंबईचे आत्मगीत उत्तेजनार्थ क्र. 1 : सुनील म्हसकर, शहापूर, जि. ठाणू - रुपये 501/- कवितेचे नाव : सृष्टीचे नंदनवन करण्या उत्तेजनार्थ क्र. 2 : आस्था शालिकराम घरडे, चंद्रपूर, जि. चंद्रपूर - रुपये 501/- कवितेचे नाव : आई उत्तेजनार्थ क्र. 3 : श्रद्धा निगडे, मुलुंड, मुंबई - रुपये 501 कवितेचे नाव : अवकाश तरी या खुल्या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा आदिंनी अभिनंदन केले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक