कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिध्द साहित्यिक श्याम मनोहर यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारक, स्वागत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली.

आस्तिक - नास्तिक हिंदुत्ववादी-बिनहिदुत्ववादी, विवेकवादी-देवभोळे अशा सर्व प्रकारच्या माणसांची समाजात गरज असते. विचारसरणी कोणतीही असली, तरी माणसाच्या मुलभूत गरजा समानच असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे टोक गाठण्यात अर्थ नाही, असे मत प्रख्यात श्याम मनोहर यांनी मांडले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक