मा. यशवंतराव चव्हाण

logo

 मा. श्री. शरदराव पवार

  • Home
  • About
    • Late. Yashwantrao Chavan
      • Devrashtre (Birth Place)
      • Virangula (Residence)
      • Preeti Sangam, Karad (Memorial)
      • Venutai Chavan (wife)
      • Vithamata Chavan (Mother)
      • Yashwant Vichar
    • About Chavan Center
    • History of Chavan Center
    • Hon'ble Sharadchandraji Pawar (President)
    • Hon'ble Supriya Sule (Chairperson)
    • Office bearers
    • Board of Trustees
    • Executive Body
    • Executive Committee
    • Right to Information
  • Verticals
    • Education
      • Shikshan Katta
      • Teacher Literature Festival
      • Dr. Kumud Bansal Award
      • Annual Education Council
      • Work under Education Vertical
      • Academy of Information Technology (AIT)
      • Publications
      • Research Centre of Social science
    • Health, Disability and Senior Citizens
      • Work under Health Vertical
      • Individuals with Disabilities
      • Senior Citizens
      • Early diagnostic Evaluation and Intervention
      • Hearing Loss Diagnosis and Treatment
      • Mental Health Awareness Program
      • Disability Global Certificate Distribution Program
      • Health insurance scheme for Disabled
      • Cochlear Implants
      • State Level Conference
      • Rajmata Jijau Scheme
      • Publications
    • Women
      • Work under Women Vertical
      • Jagar Janivancha... Tumchya Mazya Lekicha...
      • Yashaswini Samajik Abhiyan
      • Hope
      • Single Woman
      • Women's Award
      • Mental health and domestic violence
      • Women's safety
      • Financial Literacy
      • Legal literacy
      • 75 years of Independence and Women's Perspective
    • Youth
      • Work under Youth Vertical
      • Sharad Yuva Festival
      • Abhisaran - Youth Exchange Program
      • Yashwant Elocution Competition
      • College Souvenir Competition
      • Youth Development Workshops
      • Youth policy
      • Digital Media Influencer Conference
      • Young Entrepreneurship
    • Cultural
      • Work under Cultural Vertical
      • Special Initiatives
      • Film Festival
      • Farmers to Consumers
      • Srujan
  • Initiatives
    • Sharad Pawar Inspire Fellowship
    • Academy of Information Technology
    • Yashwantrao Chavan National Library
      • Pustakdoot
    • Divyang Marriage Ceremony
    • Work for Transgender
    • Mumbai Dialouge on World's Affairs
    • Mumbai Manifesto
    • ' Parivartanache Shilpakar ' - Podcast Series
      • Rajarshi Shahu Maharaj
      • Dr. Babasaheb Ambedkar
      • Mahatma Gandhi
    • Jagar Janivancha... Tumchya Mazya Lekicha...
    • Centre for Tribal Development
  • Events
  • District Centres
    • Western Maharashtra
      • Pune
      • Karad
      • Solapur
      • Kolhapur
    • North Maharashtra
      • Nashik
      • Jalgaon
      • Ahilyanagar
    • Kokan Division
      • Ratnagiri
      • Palghar
      • Thane
      • Navi Mumbai
      • Sindhudurg
    • Marathwada
      • Dharashiv (Osmanabad) Centre
      • Ambajogai
      • Chhatrapati Sambhajinagar Centre
      • Latur
      • Nanded
      • Parbhani
      • Jalna
      • Hingoli
    • West Vidarbha
      • Amravati
      • Dhule
      • Yavatmal
      • Buldhana
    • East Vidarbha
      • Nagpur
      • Gadchiroli
      • Bhandara
  • Awards
    • National Awards
      • Yashwantrao Chavan National Award
    • State Awards
      • Yashwantrao Chavan State Award
    • Youth Awards
      • Young Entrepreneur
      • Social
      • Sports
      • Literature
      • Theater and Art Award
      • Journalism
      • Innovation
    • Yashaswini Sanman Award
    • Dr. Kumud Bansal Award
  • Auditorium
  • Media
    • E - Megazine
    • Events
    • Press Note
    • Annual Report
    • Newsletter
      • Anniversary Newsletter
      • Punyatithi Newsletter
      • July
      • August
    • Print / Paper Media
    • Electronic / Online Media
  • Search
Yashwantrao Chavan Center
  • Home
  • About
    • Late. Yashwantrao Chavan
      • Devrashtre (Birth Place)
      • Virangula (Residence)
      • Preeti Sangam, Karad (Memorial)
      • Venutai Chavan (wife)
      • Vithamata Chavan (Mother)
      • Yashwant Vichar
    • About Chavan Center
    • History of Chavan Center
    • Hon'ble Sharadchandraji Pawar (President)
    • Hon'ble Supriya Sule (Chairperson)
    • Office bearers
    • Board of Trustees
    • Executive Body
    • Executive Committee
    • Right to Information
  • Verticals
    • Education
      • Shikshan Katta
      • Teacher Literature Festival
      • Dr. Kumud Bansal Award
      • Annual Education Council
      • Work under Education Vertical
      • Academy of Information Technology (AIT)
      • Publications
      • Research Centre of Social science
    • Health, Disability and Senior Citizens
      • Work under Health Vertical
      • Individuals with Disabilities
      • Senior Citizens
      • Early diagnostic Evaluation and Intervention
      • Hearing Loss Diagnosis and Treatment
      • Mental Health Awareness Program
      • Disability Global Certificate Distribution Program
      • Health insurance scheme for Disabled
      • Cochlear Implants
      • State Level Conference
      • Rajmata Jijau Scheme
      • Publications
    • Women
      • Work under Women Vertical
      • Jagar Janivancha... Tumchya Mazya Lekicha...
      • Yashaswini Samajik Abhiyan
      • Hope
      • Single Woman
      • Women's Award
      • Mental health and domestic violence
      • Women's safety
      • Financial Literacy
      • Legal literacy
      • 75 years of Independence and Women's Perspective
    • Youth
      • Work under Youth Vertical
      • Sharad Yuva Festival
      • Abhisaran - Youth Exchange Program
      • Yashwant Elocution Competition
      • College Souvenir Competition
      • Youth Development Workshops
      • Youth policy
      • Digital Media Influencer Conference
      • Young Entrepreneurship
    • Cultural
      • Work under Cultural Vertical
      • Special Initiatives
      • Film Festival
      • Farmers to Consumers
      • Srujan
  • Initiatives
    • Sharad Pawar Inspire Fellowship
    • Academy of Information Technology
    • Yashwantrao Chavan National Library
      • Pustakdoot
    • Divyang Marriage Ceremony
    • Work for Transgender
    • Mumbai Dialouge on World's Affairs
    • Mumbai Manifesto
    • ' Parivartanache Shilpakar ' - Podcast Series
      • Rajarshi Shahu Maharaj
      • Dr. Babasaheb Ambedkar
      • Mahatma Gandhi
    • Jagar Janivancha... Tumchya Mazya Lekicha...
    • Centre for Tribal Development
  • Events
  • District Centres
    • Western Maharashtra
      • Pune
      • Karad
      • Solapur
      • Kolhapur
    • North Maharashtra
      • Nashik
      • Jalgaon
      • Ahilyanagar
    • Kokan Division
      • Ratnagiri
      • Palghar
      • Thane
      • Navi Mumbai
      • Sindhudurg
    • Marathwada
      • Dharashiv (Osmanabad) Centre
      • Ambajogai
      • Chhatrapati Sambhajinagar Centre
      • Latur
      • Nanded
      • Parbhani
      • Jalna
      • Hingoli
    • West Vidarbha
      • Amravati
      • Dhule
      • Yavatmal
      • Buldhana
    • East Vidarbha
      • Nagpur
      • Gadchiroli
      • Bhandara
  • Awards
    • National Awards
      • Yashwantrao Chavan National Award
    • State Awards
      • Yashwantrao Chavan State Award
    • Youth Awards
      • Young Entrepreneur
      • Social
      • Sports
      • Literature
      • Theater and Art Award
      • Journalism
      • Innovation
    • Yashaswini Sanman Award
    • Dr. Kumud Bansal Award
  • Auditorium
  • Media
    • E - Megazine
    • Events
    • Press Note
    • Annual Report
    • Newsletter
      • Anniversary Newsletter
      • Punyatithi Newsletter
      • July
      • August
    • Print / Paper Media
    • Electronic / Online Media
  • Search

Select your language

  • मराठी
  1. Home
  2. पुरस्कार
  3. पुरस्कार
  4. राज्य पुरस्कार
0 comments
  • State Award
  • Display Youtube Video:
  • Awards Content:
    • वर्ष: 2023, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक, Youtube Video:

संवेदनशील अस्वस्थ कवी, ज्ञाननिष्ठ संशोधक, साक्षेपी विचारवंत आणि समीक्षक म्हणून आपण महाराष्ट्राला परिचित आहात. आपल्या वाङ्मयाने महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध आणि संपन्न झालेले आहे.

सत्तरच्या दशकातील 'उत्थानगुंफा' हा आपला पहिलाच काव्यसंग्रह लक्षवेधी ठरला. त्यानंतर आपले 'मूर्तीभंजन' आणि 'जीवनायन' हे मौलिक काव्य संग्रह प्रकाशित झाले. 'शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो' आणि 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे' या सारख्या ओळींनी सूर्यकुळातले कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित झालात. तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता आणि धगधगत्या ज्वालेची कविता म्हणून आपल्या कवितेस मराठी काव्यविश्वात एक विशेष स्थान आहे. आपल्या जडणघडणीच्या काळात डॉ. म. ना. वानखेडे, डॉ. भालचंद्र फडके, प्रा. रा. ग. जाधव व प्रा. वा. ल. कुळकर्णी या शिक्षकांच्या समज व वाङ्मय दृष्टीचा विलक्षण प्रभाव आपणांवर पडला. अस्वस्थ शतकाचा संवेदनशील कवी म्हणून जवळपास अकरा कवितासंग्रहातून आपली कविमुद्रा उमटविली ती महत्त्वाची ठरली. जातवास्तव आणि शोषणाची धगधगती रूपे कवितेतून मांडली. लढाऊ आक्रमकपणा व विद्रोहाचे क्रांतिशास्त्र आपल्या कवितेत आहे. संविधान मूल्याचा आणि माणुसकीचा गहिवर आपल्या कवितेतून सतत मांडत राहिलात. भांडवली सत्तेची उन्मादी रूपे व जागतिकीकरणाच्या काळ्या सावल्यांचा निषेध स्वर आपल्या कवितेने मांडला. डॉ. आंबेडकरांविषयीची गौरव-कृतज्ञता-कविता आपण गायिली. सामाजिक बांधिलकी, मानवतावादी मूल्ये, इहवादी परिवर्तन दृष्टी, चिंतनशीलता, संवादशीलता, काव्यात्मता आणि तेजस्वी शब्दकळा ही आपल्या कवितेची वैशिष्ट्ये होत. आपल्या कवितेस 'सेक्युलर कविता' म्हणून विशेष मोल आहे. कवितेबरोबरच आपण कादंबरी, ललितगद्य, समीक्षा व वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. रमाई, सावित्री व यशोधरा या महानायिकांचे भावदर्शन कादंबऱ्यांतून मांडले. आपल्या वैचारिक वाङ्मयाने मराठी विचारविश्वात मोलाची भर घातली आहे. तथागत गोतम बुद्ध, महात्मा फुले, कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीला पुढे घेऊन जाणारे 'आजचे' लेखन आपण केले. समाजचिंतन, समाजप्रबोधन व भूमिकानिष्ठ लेखनास आपण कायम महत्त्व दिले आहे. जवळपास वीस विचारग्रंथ व वीस पुस्तिकांमधून आपले विचारधन विखुरलेले आहे. बुद्धविचार व आंबेडकरी दृष्टीची भक्कम बैठक आपल्या लेखनास आहे. शंबूक, कर्ण, एकलव्य या पर्यायी वंचितांच्या वीरनायकांचा आपण घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. वैचारिक लेखनाबरोबर आपण लिहिलेली समीक्षा महत्त्वाची आहे. जवळपास पंचवीस समीक्षाग्रंथात आपली सैद्धांतिक व उपयोजित समीक्षा समाविष्ट आहे. बुद्धिवादी, इहवादी सौंदर्यशास्त्र आणि पर्यायी सिद्धान्तनांची मांडणी ही आपल्या समीक्षालेखनाची वैशिष्ट्ये आहेत. 'हस्तक्षेपाचे स्वातंत्र्य आणि सौंदर्य' असे आपल्या एकंदर समीक्षेचे स्वरूप राहिले आहे. आपल्या लेखणीतून उमटणारे समाजभान कायम ठेऊन त्याच्याशी अखंड प्रामाणिक असणारे साहित्यिक अशी आपली ओळख आहे.

भूमिकानिष्ठ कार्यकर्ता म्हणूनही आपली महाराष्ट्राला ओळख आहे. ती नेहमीच काळ व समाज सुसंगत राहिली आहे. आपण आपली सामाजिक व राजकीय हस्तक्षेपाची भूमिका कायम मांडत आला आहात. माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी सामाजिक चळवळीत सक्रीय राहिलात. बुद्ध, फुले, आंबेडकर या त्रिवेणी विचारधारेचे नव्या माणसाचे गाणे आपण लिहिले. अखंड ओघवते प्रपाती वक्तृत्व, रचनात्मकतेचा ध्यास, अपूर्व संवादशीलता, डोळस विवेकी भान आणि कार्याचे झपाटलेपण हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत. संविधानदृष्टीतील भारत हा आपल्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व वाङ्मयीन संस्थांवर आपण काम केले. आपल्या सामाजिक व वाङ्मयीन कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी आपणांस सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाच्या वाड्मय पुरस्कारासह दिनकरराव जवळकर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार तसेच महाराष्ट्र फाऊण्डेशच्या पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे द्रष्टे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ३० ऑगस्ट १९६१ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर 'डॉ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा वारसा' या विषयावर भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी दीक्षाभूमी आणि डॉ. आंबेडकरांचा विचारवारसा देशाला तारेल असे म्हटले होते. तसेच बौद्ध धर्म आणि लोकशाही यात त्यांना संगम पहायला मिळाला. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी यशंवतरावांची दृष्टी आणि आपले विचारविश्व हे एकमेकांना परस्परपूरकच आहे. सर्व प्रकारची समानता, राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाचे यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न होते. आपण त्याला पूरक लेखन आणि कार्य करत आला आहात. एकाअर्थाने उद्याच्या सुंदर दिवसांसाठी नव्या माणसांचे घोषणापत्रच आपण लिहिले आहे. त्यामुळे आपणांस यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित करताना आम्हास आनंद होतो आहे.

0 comments
  • State Award
  • Awards Content:
    • वर्ष: 2019, पुरस्कार प्रकार: ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास

एन.डी. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी या लहानशा गावांत शेतकरी कुटुंबात झाला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पाटलाघरी जन्मलेल्या या नारायणाची जन्म तारीख शाळेतील मास्तरांनीच निश्चित करुन टाकली. ती जन्म तारीख आहे १५ जुलै १९२९. त्यांच्या कुटुंबात औपचारिक शिक्षणाचा अभाव होता. परंतु एन.डी.नी परिश्रमपूर्वक अर्थशास्त्रामध्ये एम.ए. आणि विधी शाखेची एलएल.बी. या पदव्या प्राप्त करुन घेतल्या. ढवळी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोज नऊ-दहा मैलांची पायपीट करुन रयत शिक्षण संस्थेने आष्टा येथे सुरु केलेल्या हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणास सुरुवात केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले. राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या वसतीगृहात राहून ते राजाराम कॉलेजमध्ये जाऊ लागले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इत्यादि विषयांचे भरपूर वाचन केले. मार्क्स आणि लेनिन यांचे ग्रंथ वाचले. या सर्व ज्ञानार्जनातून त्यांचे वैचारिक व्यक्तिमत्त्व निर्माण होत गेले.

एन.डी. पाटील हे महाराष्ट्राला परिचित झाले ते मुख्यतः संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यवाह होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दौरा करुन संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धोरण ठरविणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना मान्यता मिळाली. ते इस्लामपूर कॉलेजचे काही वर्षे प्राध्यापक व प्राचार्य होते. परंतु त्यांचा पिंड सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरोगामी चळवळीत हिरिरीने भाग घेण्याचा होता. ऑगस्ट १९४७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. सांगलीत पक्षाची शाखा स्थापन करण्यासाठी १९४८ मध्ये झालेल्या बैठकीत एन. डी. उपस्थित होते. त्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात काम करु लागले. १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष मोठ्या संख्येने निवडून आला त्यावेळी एन. डी. विधान परिषदेत सदस्य होते. ते एकूण १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५ ते १९९० या काळात ते महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या कालावधीत पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये ते सहकार मंत्री होते. त्या काळात त्यांनी सहकार कायद्यात मूलगामी सुधारणा केल्या व कापूस एकाधिकार खरेदी योजनेचे पुनरुज्जीवन करुन ती यशस्वीपणे राबविली.

एकीकडे राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच त्यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः आपल्या मृत्युपूर्वी एन. डी. ना रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून सहभागी करुन घेतले. १९९० मध्ये ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. तेव्हांपासून कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या या ध्येयवादी शिक्षण संस्थेचे ते नेतृत्व करीत आहेत. गरीबातील गरीब आणि सामान्यातील सामान्य विद्यार्थी यांच्या हिताचा विचार त्यांच्या कार्यामध्ये केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्यांनी या संस्थेमार्फत हाती घेतलेले अनेक उपक्रम हे त्यांच्या वरील ब्रीदाशी सुसंगत आहेत. दहावी- बारावीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नापासांची शाळा, दुर्गम ग्रामीण भागातील आश्रम शाळा, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी चालविलेली साखर शाळा ही याची काही उदाहरणे आहेत. त्याचबरोबर काळाची पाऊले ओळखून संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठीही त्यांनी सतत परिश्रम घेतले. गरीब विद्यार्थ्यांना उत्तम व उच्च शिक्षण उपलब्ध करुन दिले तरच त्यांची व राज्याची खऱ्या अर्थाने उन्नती साधता येईल, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. वंचितांसाठी शिक्षण ही कर्मवीरांची प्रेरणा घेऊन ते रयत शिक्षण संस्थेच्या कामाला भविष्यदर्शी दिशा देत राहिले. त्यातूनच रयत शिक्षण संस्थेमध्ये औद्यागिक प्रशिक्षण संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील नॉलेज अँड टेक्नॉलॉजी इंस्टिट्युट, गुरुकुल प्रकल्प, सावित्रीबाई फुले दत्तक पालक संस्था व विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन अशा संस्था त्यांनी स्थापन केल्या.

एन.डीं.चे आयुष्य पुरोगामी चळवळी, सत्याग्रह आणि आंदोलने यांनी व्यापलेले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी १९४५ मध्ये ग्रामीण भागात दारुच्या दुकानासमोर केलेले पिकेटिंग हे त्यांचे पहिले आंदोलन. गोवामुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची अंमलबजावणी, सीमा प्रश्न, धरणग्रस्तांचे आंदोलन, जागतिकीकरणाविरोधातील आंदोलने अशा अनेक आंदोलनात त्यांनी सामान्य जनतेचे नेतृत्व केले. त्यांच्या आग्रही प्रतिपादनामुळे महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्याचे ठरविले व त्याची सर्व जबाबदारी एन. डी. पाटील यांच्यावर सोपविली. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. समाजाच्या परिघावरील किंवा परिघाबाहेरील सामान्य माणसांच्या कल्याणासाठी ज्या ज्या परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या चळवळींमध्ये एन. डीं. चा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला आहे अशा समाजासाठी एन. डीं. चे नेतृत्व हा मोठाच आधारस्तंभ राहिला आहे.

गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षात त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आमदार कोट्यातून मिळणारी सदनिका आणि मुख्यमंत्री कोट्यातून मुलाला मिळालेला वैद्यकीय शाखेतील प्रवेश त्यांनी सहजपणे नाकारला. त्यांनी काही काळ राष्ट्रीय बियाणे मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. तेदेखील या पदाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा भत्ता घेणार नाही अशी अट घालून. ते संस्थेची गाडी कधी वापरीत नाहीत. त्यांच्या साध्या राहणीच्या या निष्ठावंत बांधिलकीमुळे त्यांनी आदर्श लोकप्रतिनिधी व लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. त्यांच्या सत्प्रवृत्त व झुंजार नेतृत्वाला दाद देऊन स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या नामवंत संस्थांनी सन्माननीय डी. लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. अशा या ध्येयवादी व कर्मयोगी व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान करताना 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई'ला विशेष आनंद होत आहे.

0 comments
  • State Award
  • Awards Content:
    • वर्ष: 2020, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य-संस्कृती / कला

२०२० चा राज्यस्तरीय पुरस्कार १९५० मध्ये कवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेला देण्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ठरविले आहे. एरवी नाशिकची प्रसिद्धी एक धार्मिक तीर्थक्षेत्र व दर १२ वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पवित्र ठिकाण अशी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिक हे क्रांतिकारक चळवळीचे केंद्र होते. १९५० मध्ये नाशिकला कायमच्या वास्तव्यासाठी आलेल्या कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये मराठी साहित्य आणि कला विचार यांच्या संवर्धनासाठी एक सांस्कृतिक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. दिनांक २ सप्टेंबर १९५० रोजी अग्रणी समाजसुधारक व शतपत्रांचे कर्ते श्री. गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांच्या नावाने लोकहितवादी मंडळाचे उद्घाटन म.म. दत्तो वामन पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हांपासून प्रामुख्याने नाट्यसंगीत, चित्रकला, शिल्पकला व अन्य कला तसेच साहित्यविषयक घडामोडी व सामाजिक विचारसरणीचा पाठपुरावा करणारे कार्य मंडळ पार पाडत आहे.

१९५० च्या डिसेंबरमध्ये श्री. राम गणेश गडकरी यांचे 'भावबंधन' हे नाटक सादर करण्यात आले. कुसुमाग्रजांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. गेली सात दशके नाट्यक्षेत्रामध्ये मंडळाने लक्षणीय कार्य केलेले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत मंडळाला जवळ जवळ दरवर्षी पारितोषिक मिळाले आहे. हिंदी आणि संस्कृतमध्येही मंडळाने नाटके सादर केली असून बालनाट्य आणि कामगार स्पर्धांमध्येही भाग घेतलेला आहे. मंडळाच्या या कार्यातून अनेक कला दिग्दर्शकांना, नवोदित लेखकांना, संगीत दिग्दर्शकांना तसेच प्रकाश योजना, रंगभूषा आणि नेपथ्य या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपली कला सादर करण्यास वाव मिळालेला आहे. २०१५ पासून मंडळाने नाटकाच्या अभिवाचन स्पर्धा घेतल्या आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे झाशी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिरात जेथे झाशीच्या राणीचा साखरपुडा झाला होता अशा ऐतिहासिक ठिकाणी २०१२ मध्ये 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन झाले.

विष्णू दिगंबर पलूसकर हे ख्यातनाम संगीत गुरू नाशिकला स्थायिक झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाट्यसंगीत स्पर्धा मंडळातर्फे आयोजित केल्या जातात. संगीताला उत्तेजन देण्यासाठी मंडळाने अखिल महाराष्ट्र संगीत स्पर्धांचे आयोजन १९६७ पासून केले आहे. अनेक नामवंत गायकांच्या मैफिली आयोजित केलेल्या आहेत. तसेच नोव्हेंबर १९९९ मध्ये तीन दिवस अखिल भारतीय स्तरावर संगीत शिक्षक अधिवेशन आणि संमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाचे कार्यक्रम, म्हणजे हार्मोनियम वादन, गीत स्वरलेखन कार्य शाळा, बासरी संवाद व ताल समर्पण संवाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

भारत सरकारने राष्ट्रीय सांस्कृतिक धोरण मसुदा तयार केला होता. त्यावर नाशिकला तीन दिवसांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळचे मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला होता. त्याचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. शिवराम कारंथ यांनी केले होते. या परिसंवादामध्ये करण्यात आलेल्या मौलिक सूचना राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्या.

साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक विषयांशी संबंधित प्रश्नांवर विचार मंथन व्हावे यासाठी महात्मा फुले यांच्या नावाने जिल्ह्यात ग्रामीण भागात व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. कालांतराने अशी व्याख्याने मंडळाच्या स्थापना दिनादिवशी आयेजित करण्यात येतात. कविता या साहित्य प्रकाराला साहजिकच मंडळाने विशेष प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी काव्यानुभव समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये नामवंत कवी तसेच नवोदित कवी व बालकवी यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम केला जातो.

१९९६ मध्ये मंडळाने कला विभाग सुरु केला. त्याचा शुभारंभ ख्यातनाम चित्रकार व माजी कला संचालक, श्री. बाबुराव सडवेलकर यांच्या हस्ते झाला. कला विभागीय उपक्रमांमध्ये पावसाळी सहल, गुरुशिष्य संवाद आणि कलाविषयक कार्यशाळा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. मंडळाने वार्षिक चित्रकला शिबीर दोन वेळा आयोजित केले होते.

१९९९ मध्ये पहिला राज्यस्तरीय कला मेळावा नाशिकला घेण्यात आला. लोकहितवादी मंडळाचे कार्य स्वतःच्या वास्तूमधून चालावे यासाठी नाशिक महानगरपालिकेने मंडळाला एक भूखंड काही अटींवर दिला. या वास्तूच्या उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी मुख्यमंत्री निधीतून भरीव अर्थ सहाय्य केले होते. महात्मा फुले यांचे कार्य स्मरणात असावे म्हणून व वास्तूच्या रचनेत छपरावर कलशाचे शिल्प असल्याने कुसुमाग्रजांनी या वास्तूस 'ज्योतीकलश' हे नांव दिले. ज्योतीकलश उभा आहे त्या परिसराला विशाखा प्रांगण हे नांव देण्यात आले. 'विशाखा' हा कुसुमाग्रजांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे हे लक्षात घेऊन नामकरण करण्यात आले आहे.

साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे. तो मराठीतील मोजक्याच साहित्यिकांना मिळाला आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हां मंडळाने भव्य अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी कुसुमाग्रजांच्या मनातील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक जाणिवांना कायमस्वरुप देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या स्थापनेमध्ये मंडळाचे भरीव योगदान आहे.

कुसुमाग्रज हे मराठीतील नामांकित कवी व नाटककार आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कामगिरीप्रमाणेच समाजाविषयी सजग व क्रियाशील विचारवंत म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विशेषतः मराठी भाषेचे संवर्धन व विकास यांचा ध्यास असलेले साहित्यिक म्हणून त्यांच्या जन्मदिवशी (२७ फेब्रुवारी) राज्य शासनातर्फे मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

नामवंत कवी व लेखकांचे स्वतःच्या एखाद्या कृतीशी अभिन्न नाते असते. उदा. केशवसुतांची 'तुतारी' ही कविता, राम गणेश गडकरी यांची 'क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा' ही कविता, भा. रा. तांबे यांची 'मधुघट' व वि.स. खांडेकरांची 'ययाति' यांचा उल्लेख करता येईल. याप्रमाणे कुसुमाग्रजांच्या अनेक कविता जनमानसात खोल रुजलेल्या आहेत - उदाहरणार्थ 'गर्जा जयजयकार', 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात'. ज्यावेळी कवीचे काव्य आणि सामान्य वाचकाच्या भावभावना यांच्या तारा एकाच गतीने झंकारतात तेव्हांच ही किमया घडते. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' मधील 'घर देता का घर' हे स्वगत असेच मराठी माणसाच्या मनात घर करुन आहे.

कुसुमाग्रजांची एक साहित्यिक म्हणून अष्टपैलू कामगिरी लक्षात घेता व गेली सात दशके त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे बहुमोल कार्य लक्षात घेता या संस्थेला या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई'ला विशेष आनंद होत आहे.

0 comments
  • State Award
  • Awards Content:
    • वर्ष: 2021, पुरस्कार प्रकार: विज्ञान-तंत्रज्ञान

In the Bhagvadgita, there is a Chapter on "The Tree of Life". It speaks about imperishable aśvatth (peepal tree) as having its root above and branches below. It is also said that its real form is not perceived here nor its end, nor beginning nor its foundation. Further progress is possible when this firmly rooted aśvatth is cut with the strong sword of non-attachment. It can be said that this description reflects the challenge before the scientists, who are looking for a new way to immunize people against a known or a new disease, for the branches in the form of data are spread all over the globe and the formulae for elusive material are as difficult as searching for the roots of the tree of life above. It is, therefore, commendable that the Serum Institute of India, recipient of this year's State Level Yashwantrao Chavan Award, has nominated its Chief Scientist to receive the Award.

The Serum Institute of India was founded in 1966 by Dr. Cyrus Poonawalla, Chairman and Managing Director. Its aim was to manufacture lifesaving and immuno-biologicals, which were in short supply in the country and had to be imported at high prices. The endeavor of the Serum Institute resulted in several lifesaving biologicals being manufactured in India at affordable prices and in abundance. As a result, the country became self-sufficient for Tetanus Anti-toxin and Anti-Snake Venom Serum, DTP group of vaccines and the MMR group of vaccines. The Institute has also succeeded in bringing down the prices of newer vaccines such as Hepatitis-B, Combination vaccines, etc., so that the benefit of affordable prices reaches the underprivileged children from all over the world.

The Institute is now the world's largest vaccine manufacturer. It is estimated that 65 per cent of the children in the world received at least one vaccine manufactured by the Serum Institute of India. The vaccines are accredited by the World Health Organization, Geneva and are being used in around 170 countries under their National Immunization Programmes. The Institute is not only known for the quantity of its manufacturing of vaccines, it is also known for its cutting age genetic cell based technologies. The Institute has established modern laboratories with high-tech machinery and computerized equipment. The production facilities are continuously upgraded. It has crossed many milestones by installing robotic arm for virus handling, cell factory and cell cube for growing cells, facilities for manufacturing of polysaccharide and recombinant vaccines and for monoclonal antibodies. Sophisticated systems have been installed to ensure accuracy and consistency. The inspection is done fully automatically, thus reducing the margin of human error. Serum Institute's quality control laboratories are equipped with wide array of sophisticated analytical equipment. The technical team of the Institute has developed systems to ensure that quality is built into the process, leading to consistency of output.

The Serum Institute has flexibility to produce vaccines at more than one plant, thus facilitating production of large number of doses in a short time. The capacity and capability of the Institute were put to test in the raging Covid-19 pandemic and it came out with flying colours. Besides, the Institute has acquired a Bioengineering and Pharmaceutical Company from Netherland Government, which enhances the Institute's product line in the pediatric line segment. The acquisition also provides important manufacturing base in Europe with access to strategic European markets.

The Poonawalla Bio-Tech Park at Manjari in Pune is spread over a sprawling area of 42 acres. This State-of- the-Art facility is designed to meet the highest standards set by a plethora of regulatory agencies including MHRA, US-FDA and those of Europe, Japan, Australia, etc. To begin with products like HPV, TdaP, Monoclonal Antibodies/Biosimilars, Rotavirus vaccine and recombinant BCG vaccine will be manufactured here using the modern technology.

In view of its outstanding record in manufacture of vaccines and lifesaving biologicals and its commitment to quality control, the Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai is pleased to honour the Serum Institute of India by conferring on it the Yashwantrao Chavan State Level Award 2021.

0 comments
  • State Award
  • Awards Content:
    • वर्ष: 2024, पुरस्कार प्रकार: मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक, Youtube Video:

महाराष्ट्राला जसा जाज्वल्य संघर्षाचा इतिहास लाभला आहे, तशी या इतिहासाला कालचक्राच्या अंधारातून मुक्त करत त्यावर प्रकाश टाकणाऱ्या इतिहासकारांची परंपरा ही लाभली आहे. महाराष्ट्राच्या अशा थोर इतिहास संशोधनाच्या परंपरेतील एक तपस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार होय. ज्यांनी आयुष्यभर इतिहास संशोधनाचा ध्यास घेतला आणि आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून इतिहास लेखनावर अव्यभिचारीनिष्ठा ठेवली अशा धैर्यशील परंपरेचे डॉ. पवार एक पाईक आहेत.

सांगली जिल्ह्यात जन्माला आलेल्या डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांनी 1964 मध्ये इतिहास या विषयात एम ए ही पदवी विद्यापीठात प्रथम येऊन मिळवली. एम ए झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ.आप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन सहाय्यक म्हणून 1964 साली निवड केली. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी डॉ. पवारांच्या हाती शिवकालीन इतिहासाची कागदपत्रे पडली आणि प्राध्यापक व्हायला निघालेले डॉ. पवार ऐन तारुण्यात इतिहास संशोधक बनले. शिवाजी विद्यापीठातील संशोधन प्रशिक्षणामुळे डॉ.पवारांची संशोधक म्हणून जडणघडण झाली.

वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी डॉ. पवार यांनी इतिहासात उपेक्षित राहिलेल्या कोल्हापूरकर महाराणी जिजाबाई यांचा इतिहास आपल्या पहिल्या शोधनिबंधातून प्रथम प्रकाशात आणला. या त्यांच्या शोधांचे कौतुक थोर इतिहासकार श्री न.र.फाठक यांनी खुल्या अधिवेशनात सर्वोत्कृष्ट शोधनिबंध म्हणून केले आणि इतिहास संशोधक म्हणून डॉक्टर पवारांनी सुरू केलेल्या वाटचालीत हा शोध निबंध मैलाचा दगड ठरला.

शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत असतानाच डॉ. पवार यांना थोर इतिहास पंडित सेतू माधवराव पगडी आणि इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. ते एक प्रकारचे संशोधन प्रशिक्षणच होते. डॉ.पवार या दोन्ही विद्वानांना आपल्या गुरुस्थानी मानतात. इतिहास संशोधन क्षेत्रातील पहिले धडे डॉ. आप्पासाहेब पवार, पंडित सेतू माधवराव पगडी व वा.सी बेंद्रे यांच्याकडून घेतले असे डॉ. पवार कृतज्ञतेने नमूद करतात.

डॉ. पवार यांनी आपल्या संशोधकीय वाटचालीत अनेक इतिहास परिषदांच्या व्यासपीठावरून 45 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. यात मराठीशाहीच्या अज्ञात पैलूंवर संशोधन करून मराठा इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे. यात शिवरायांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती , शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ, सूर्याजी पिसाळ फितुरीतून दोष मुक्त , संभाजी महाराज व राजाराम महाराजांच्याअज्ञात राण्या, छत्रपतीं राजारामाचा अनौरस पुत्र राजा कर्ण यासारख्या अनेक अज्ञात विषयांवर प्रकाश टाकला.

1992 मध्ये डॉ. पवारांनी The Maratha State Under Rajaram या विषयावर पीएचडी ही पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील विदाऊट गाईड पीएचडी सादर केलेला हा पहिला व शेवटचा प्रबंध होता. डॉ. पवार यांनी 1965 मध्ये हातामध्ये घेतलेली लेखणी आजतागायत खाली ठेवलेली नाही. स्वाभाविकच त्यांची ग्रंथसंपदा विपुल झाली आहे. डॉ. पवारांनी आपल्या कारकीर्दीत 32 इतिहास ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यामध्ये शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज ,महाराणी ताराबाई , सेनापती संताजी घोरपडे, राजर्षी शाहू छत्रपती,क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी विषयांवरील ग्रंथ प्रामुख्याने सांगता येतील.

शाहू संशोधन केंद्राचा संचालक म्हणून डॉक्टर पवार यांनी बारा खंडाचे संपादन केले आहे. यामध्ये प्रो. लठ्ठ्यांचे शाहू चरित्र, लाटकर शास्त्री कृत संस्कृत मधील शाहू चरित्र, डॉ. बाळकृष्ण स्मृती ग्रंथ,डॉ. ब्रानकृष्णांचा शिवाजी द ग्रेट ग्रंथ, इंग्रजी व मराठी क्षात्रजगतगुरुंचे विचार दर्शन,कोल्हापूरचा पंचगंडात्मक इतिहास हे विशेष उल्लेखनीय ग्रंथ आहेत. डॉक्टर पवारांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. आजवर सामाजिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल डॉक्टर पवारांना एकूण 30 पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी काही असे, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, सत्यशोधक दिनकर जवळकर पुरस्कार, मराठा मंदिर जीवन गौरव पुरस्कार, भाई वैद्य पुरस्कार हे विशेष उल्लेखनीय पुरस्कार आहेत.

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या आणि डॉ. चौधरी नावाच्या गृहस्थाने संपादन केलेल्या कोल्हापूर गॅझेटियर मध्ये राजर्षी शाहू महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला होता. डॉ. पवारांनी पुराव्यानिशी हे विकृतीकरण खोडून काढून शासनाला सत्य इतिहासावर आधारित नवा मजकूर गॅझेटियर मध्ये घालण्यास भाग पाडले. अशाप्रकारे राजर्षी शाहूंवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यात डॉ.पवार यशस्वी झाले.

1989-90 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याची त्रिशताब्दी सर्वत्र साजरी केली गेली त्यानिमित्ताने डॉ. पवार यांनी छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ प्रकाशित करून स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपती च्या व्यक्तिमत्त्वावर व कामगिरीवर अनेक अंगानी प्रकाश टाकून त्याच्या तेजस्वी पराक्रमी व स्वातंत्र्यप्रेमी प्रतिमा समाजासमोर सादर केली या ग्रंथास डॉक्टर पवार यांनी 165 पानांची विवेचक प्रस्तावना लिहून संभाजी महाराजांवरील आरोपांचे खंडन केले. अशा प्रकारचा स्मारक ग्रंथ हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे ज्याने धर्मवीर संभाजी महाराजांना स्वातंत्र्यवीर ठरवले गेले.

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध 1681 ते 1707 हे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णयोग मानले जाते. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे या युगाचे खरे नायक आहेत. पैकी छत्रपती संभाजीराजांवर बऱ्यापैकी चरित्र ग्रंथ निर्माण झाले असले तरी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांची चरित्र उपेक्षित राहिली होती. डॉ. पवारांनी सतत दहा वर्ष संशोधन करून शिवपुत्र राजाराम महाराज हा बृहद चरित्र ग्रंथ लिहून प्रकाशित केला मराठ्यांच्या इतिहासातील हे पहिले राजाराम चरित्र होय या ग्रंथात राजाराम महाराजांच्या राजनैतिक मुत्सद्येगिरीवर प्रथमच प्रकाश टाकला गेला महाराष्ट्र शासनाचा इतिहासातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून राजाराम चरित्रास पुरस्कार मिळाला.

डॉ. रिचर्ड इटन या अमेरिकन इतिहासकाराच्या मते महाराणी ताराबाईंच्या पराक्रमास जगाच्या इतिहासात तोड नाही आशिया खंडातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश औरंगजेब बादशहाशी मराठ्यांच्या या राणीने सात वर्ष लष्करी संघर्ष करून पराभूत केले. तिचे चरित्र कोणाही इतिहासकारांनी लिहिले नव्हते. डॉ.पवारांनी पंधरा वर्षे संशोधन करून मराठीतील पहिले ताराबाई चरित्र लिहून प्रकाशित केले हा ग्रंथ सुमारे 800 पानांचा हा ग्रंथ म्हणजे डॉ. पवारांच्या कामगिरीतील Magnum Opus मानला जातो या ग्रंथालाही महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरविले आहे.

राजर्षीं शाहू यांच्याविषयी वाटणाऱ्या अपार्य कृतज्ञतेच्या भावनेने डॉ पवारांनी राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ प्रसिद्ध केला. सुमारे 2000 पानांचा व पाचशेच्या छायाचित्रांचा हा मराठीतील पहिला बृहद स्मारक ग्रंथ आहे. मा. शरद पवार साहेबांच्या प्रेरणेने शाहू चरित्र विविध भाषांमध्ये आणण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प डॉ. पवारांनी हातात घेतला असून त्यांनी आजवर शाहू चरित्र मराठी, कन्नड, कोकणी, तेलगू ,गुजराती ,सिंधी ,बंगाली, तामिळ, इत्यादी भारतीय भाषात व इंग्रजी, जर्मन, इटालियन, रशियन अशा विदेशी भाषेत आणले आहे. जगातील एकूण 25 भाषामध्ये शाहू चरित्र आणण्याचा डॉ.पवार यांचा मानस असून हा मराठी साहित्य क्षेत्रातील एक विक्रमच मानला जाईल. डॉक्टर पवारांच्या शाहू ग्रंथामुळे फुले आंबेडकर या शृंखलेतील मधला शाहूंचा दुवा अधिक प्रकाशमान झाला शाहूंच्या युग कार्याचे अनेक अज्ञात पैलू प्रकाशात आले. हा ग्रंथ महाराष्ट्रात घरोघरी गेला आणि फुले शाहू आंबेडकर हा महाराष्ट्राचा ब्रँड तयार झाला.

महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन व त्याद्वारे समाज प्रबोधन या उद्दिष्टाने डॉ. पवार यांनी सन 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. इतिहासाला वाहिलेली ही दक्षिण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.

डॉ.जयसिंगराव पवारांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात इतिहासाबद्दल अनेक वाद निर्माण झाले. या वादामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन ढवळून निघाले.या वादांमध्ये डॉ.पवार यांनी संशोधन करून सत्य इतिहास समाजासमोर मांडला. डॉ. पवारांच्या सत्यान्यवेशी इतिहास लेखनाचा गाभा हा इतिहासातील दुर्लक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या कार्याची इतिहास लेखनात नोंद करणे आणि या सर्वातून समाज प्रबोधन करणे हा आहे. म्हणूनच त्यांच्या आयुष्याचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेचे ब्रीद इतिहासो हि राष्ट्रस्य समाजस्य प्रबोधकः असे आहे. हेच डॉ. पवार यांच्या इतिहास लेखनाचे सूत्र आहे.

डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

0 comments
  1. मधु मंगेश कर्णिक

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

डॉ. अभय बंग - डॉ. राणी बंग

राष्ट्रीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

सौम्या स्वामीनाथन

राष्ट्रीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

अझीम प्रेमजी

राष्ट्रीय पुरस्कार
2022
Mangesh Mane

डॉ. रेणू स्वरूप

राष्ट्रीय पुरस्कार
2021
Mangesh Mane

श्री. विवेक सावंत

राष्ट्रीय पुरस्कार
2020
Mangesh Mane

डॉ. अभिजित बॅनर्जी

राष्ट्रीय पुरस्कार
2019
Mangesh Mane

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक

डॉ. जयसिंगराव पवार

मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
2024
Mangesh Mane

डॉ. यशवंत मनोहर

मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
2023
Mangesh Mane

मधु मंगेश कर्णिक

मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
2022
Mangesh Mane

सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया

विज्ञान-तंत्रज्ञान
2021
Mangesh Mane

लोकहितवादी मंडळ

मराठी साहित्य-संस्कृती / कला
2020
Mangesh Mane

प्रा. एन्. डी. पाटील

ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
2019
Mangesh Mane

युवा पुरस्कार

अदिती स्वामी

युवा क्रीडा पुरस्कार
2023
Mangesh Mane

स्वप्नील कुसळे

युवा क्रीडा पुरस्कार
2023
Mangesh Mane

साक्षी धनसांडे

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2023
Mangesh Mane

डॉ. प्रशांत खरात

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2023
Mangesh Mane

राजू केंद्रे

युवा सामाजिक पुरस्कार
2023
Mangesh Mane

राही मुजुमदार

युवा सामाजिक पुरस्कार
2023
Mangesh Mane

संदेश भोसले

युवा उद्योजक पुरस्कार
2023
Mangesh Mane

मीनल वर्तक

युवा उद्योजक पुरस्कार
2023
Mangesh Mane

मयुर शितोळे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023
Mangesh Mane

जगदीश कन्नम

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023
Mangesh Mane

पर्ण पेठे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023
Mangesh Mane

अमोल देशमुख

युवा साहित्य पुरस्कार
2023
Mangesh Mane

पूजा भडांगे

युवा साहित्य पुरस्कार
2023
Mangesh Mane

दिपाली जगताप

युवा पत्रकारिता पुरस्कार
2023
Mangesh Mane

कुलदीप माने

युवा पत्रकारिता पुरस्कार
2023
Mangesh Mane

शर्मिष्ठा भोसले

युवा पत्रकारिता पुरस्कार
2022
Mangesh Mane

पवन नालट

युवा साहित्य पुरस्कार
2022
Mangesh Mane

अनिता माळगे

युवा उद्योजक पुरस्कार
2022
Mangesh Mane

अनिश सहस्त्रबुद्धे

युवा उद्योजक पुरस्कार
2022
Mangesh Mane

रुद्राक्ष पाटील

क्रीडा पुरस्कार
2022
Mangesh Mane

हेमलता पडवी

सामाजिक पुरस्कार
2022
Mangesh Mane

सारंग नेरकर

इनोव्हेटर पुरस्कार
2022
Mangesh Mane

दिव्यप्रभा भोसले

इनोव्हेटर पुरस्कार
2022
Mangesh Mane

सुमित पाटील

इनोव्हेटर पुरस्कार
2022
Mangesh Mane

मुग्धा डिसोझा

रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022
Mangesh Mane

महेश खंदारे

रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022
Mangesh Mane

शाहीर सुमित धुमाळ

रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022
Mangesh Mane

रवी चौधरी

सामाजिक पुरस्कार
2021
Mangesh Mane

छाया भोसले

सामाजिक पुरस्कार
2021
Mangesh Mane

स्वरूप उन्हाळकर

पॅरा शूटिंग - 10m Standing, 10m Prone, 50m Prone
2021
Mangesh Mane

यशस्विनी सन्मान पुरस्कार

राजश्री गागरे

यशस्विनी उद्योजिका सन्मान
2024
Mangesh Mane

श्रद्धा नलमवार

यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान
2024
Mangesh Mane

संध्या नरे- पवार

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
2024
Mangesh Mane

कलावती सवंडकर

यशस्विनी कृषी सन्मान
2024
Mangesh Mane

रुक्मिणी नागापुरे

यशस्विनी सामाजिक सन्मान
2024
Mangesh Mane

मीनाक्षी पाटील

यशस्विनी साहित्य सन्मान
2024
Mangesh Mane

भारती नागेश स्वामी

यशस्विनी कृषी सन्मान
2023
Mangesh Mane

डॉ. सुनिता बोर्डे -खडसे

यशस्विनी साहित्य सन्मान
2023
Mangesh Mane

राजश्री हेमंत पाटील

यशस्विनी उद्योजकता सन्मान
2023
Mangesh Mane

लक्ष्मी नारायणन

यशस्विनी सामाजिक सन्मान
2023
Mangesh Mane

शैलजा जैनेंद्रकुमार जैन

यशस्विनी क्रिडा प्रशिक्षक सन्मान
2023
Mangesh Mane

शर्मिला प्रभाकर कलगुटकर

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
2023
Mangesh Mane

सिमरत गायकवाड

यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान
2022
Mangesh Mane

शीला शेखर साबळे

यशस्विनी उद्योजकता सन्मान
2022
Mangesh Mane

मनस्विनी लता रवींद्र

यशस्विनी साहित्य सन्मान
2022
Mangesh Mane

गोदावरी डांगे

यशस्विनी कृषी सन्मान
2022
Mangesh Mane

शुभदा देशमुख

यशस्विनी सामाजिक सन्मान
2022
Mangesh Mane

जान्हवी प्रसाद पाटील

यशस्विनी पत्रकारिता सन्मान
2022
Mangesh Mane

डॉ. कुमुद बन्सल पुरस्कार

सौ.मनीषा मालुसरे

गुणवंत शिक्षक पुरस्कार
2024
Mangesh Mane

उमेश चोरे

गुणवंत शिक्षक पुरस्कार
2024
Mangesh Mane

कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2024
Mangesh Mane

बाळासाहेब घोडे

गुणवंत शिक्षक पुरस्कार
2023
Mangesh Mane

शिकता शिकविता

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2023
Mangesh Mane

दिपाली सावंत

गुणवंत शिक्षिका पुरस्कार
2023
Mangesh Mane

कर्णबधिरांच्या विश्वात

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2022
Mangesh Mane

मराठी विज्ञान परिभाषा

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2022
Mangesh Mane

ऑनलाइन शिक्षणपद्धती

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2022
Mangesh Mane

शिकणारी शाळा 'अभि'रंग

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2022
Mangesh Mane

शिकणारी शाळा 'बाल'रंग

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
2022
Mangesh Mane

यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान

विनायक बोराळे

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

सोमनाथ गवस

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

ज्ञानेश्वर खरात

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

कमल बारुळे

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

विजया शिंदे

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

रेखा रवींद्र बागुल

राज्यस्तरीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

अण्णासाहेब टेकाळे

राज्यस्तरीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

डॉ. श्रीरंग कद्रेकर

राज्यस्तरीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

मीनल मतीमनोहर ठाकोर

राज्यस्तरीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान

ज्येष्ठ नागरिक संघ, चैतन्यनगर, जळगाव

राज्यस्तरीय पुरस्कार
2024
Mangesh Mane

ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद व परिसर

राज्यस्तरीय पुरस्कार
2023
Mangesh Mane

कविवर्य ना. धो. महानोर पुरस्कार

गणेश घुले

साहित्य पुरस्कार
2024
Mangesh Mane

महेश लोंढे

साहित्य पुरस्कार
2024
Mangesh Mane

नामदेव कोळी

साहित्य पुरस्कार
2024
Mangesh Mane

प्रदीप कोकरे

साहित्य पुरस्कार
2024
Mangesh Mane

वर्षा हाडके

शेती-पाणी पुरस्कार
2024
Mangesh Mane

शीला खुणे

शेती-पाणी पुरस्कार
2024
Mangesh Mane

Videos

Websites for Reference

  • Yashwantrao Chavan Comprehensive Reference Literature
  • Maharashtrian Encyclopedia Sridhar Venkatesh Ketkar
  • Dharmananda Kosambi overall literature
  • Maharshi Vitthal Ramji Shinde Composite Literature
  • Historian Vishwanath Kashinath Rajwade Comprehensive Reference Literature

Quick Links

  • Yashwantrao Chavan National Library
  • Blogs
  • Write us
  • Become a Volunteer
  • Share your Idea
  • Careers
  • Annual Report
  • Important Notice
  • Site Map
  • Offices in Chavan Center area

Newsletter

Antispam

Contact

Yashwantrao Chavan Centre
Yashwantrao Chavan Centre

Gen. Jagannathrao Bhosle Marg,
Nariman Point, Mumbai - 400021
Telephone number :
022- 22045460, 022-22852345
Fax: 022-22852082
E-Mail: info@chavancentre.org

  •  
  •  
  •  
  •  
  •  

Copyright © 2022 Yashwantrao Chavan Center. All rights reserved. Designed & Developed by Sterling Systems Pvt. Ltd.

  • Terms and Conditions
  • Privacy Policy